Ambolgad Fort
- sushil kambli
- Apr 30, 2020
- 1 min read
Updated: Jul 18, 2020
किल्ल्याजवळ गगनगिरी महाराजांचा मठ आहे.याच ठिकाणी गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या व ध्यानधारणा केली होती.मठा वरून तुम्हाला समुद्राचे सुंदर द्रुश्य दिसते . समुद्राच्या लाटा सतत गडाच्या दगडी कठडय़ाला येऊन आदळतात त्यामुळे निर्माण होणारे शुभ्र फेसाळ कारंजे डोळ्यात टिपण्यासारखे असतात . येथे तुम्हाला आंबोळगड चौपाटी देखील पाहता येते

रत्नागिरी जिल्ह्यापासून सुमारे 59.2 किमी अंतरावर असलेले आंबोळगड किल्ला आंबोळ्गड गावात समुद्रा शेजारील उंचवट्यावर वसवलेला किल्ला आहे. रत्नागिरीहुन जाताना वाटेत नाटे गाव लागते तिथून दोन किलोमीटर पुढे गेल्यावर दोन फाटे फुटतात एक फाटा मुसाकाझी बंदरास जातो आणि दुसरा आंबोळगडला . नाटे गावातून जाताना डाव्या बाजूस यशवंत गड दिसतो. आंबोळगड व यशवंत गड "मुसाकाजी" बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आले होते. १८१८ मध्ये कर्नल इमलॉक याने हा किल्ला जिंकला. १८६२ नंतर आंबोळगडावरील वस्ती उठली. सुमारे १२०० चौरस मीटर किल्ल्याचे क्षेत्रफळ आहे. गावातून गडावर जाण्यासाठी ५ ते ७ मिनिटे लागतात. किल्ला फिरायला १० ते १५ मिनिटे लागतात. जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:- किल्ल्याजवळच्या सड्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे . याच ठिकाणी गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या व ध्यानधारणा केली होती.मठा वरून तुम्हाला समुद्राचे सुंदर द्रुश्य दिसते . समुद्राच्या लाटा सतत गडाच्या दगडी कठडय़ाला येऊन आदळतात त्यामुळे निर्माण होणारे शुभ्र फेसाळ कारंजे डोळ्यात टिपण्यासारखे असतात . संध्याकाळच्या वेळी येथील निसर्ग पाहण्या सारखा असतो . येथे तुम्हाला आंबोळगड चौपाटी देखील पाहता येते चौपाटीवर तुम्हाला उभी केलेली सुंदर जहाजे दिसतात. राहाण्याची आणि जेवण्याची सोय :- पर्यटकांचा मुक्काम गावात होऊ शकतो . गडावर जेवणाची सोय नसल्यामुळे .तेथील जवळील गाव आंबोळगड , पडवणे किंवा नाटे येथे जेवणाची होऊ शकते . कसे जावे :- रत्नागिरीहून आडीवरे- नाटे -आंबोळगड यामार्गे अथवा राजापूर-नाटे-आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते.
Comments